हृदय विकार व आजची जीवन पद्धती / Heart Disease And Today’s Life Style

HD00 हृदय विकार व आजची जीवन पद्धती / Heart Disease And Today's Life Style
HD00 हृदयविकार व आजची जीवन पद्धती.jpg

हृदय विकार व आजची जीवन पद्धती

नमस्कार मित्रांनो , जसे कि आपण सर्वजण अनुभवतो व पाहतो आहोत की, आजकाल सगळीकडे सामान्यतः ऐकतो की अल्पशा आजाराने किंवा हृदयविकाराच्या झटक्याने अमुक अमुक अनंतात विलीन . येथे अल्पशा आजाराने हा शब्द देखिल बहुतांशी जवळ जवळ हृदयविकाराशी संबधित असतो . यात विशेष म्हणजे सर्व वयोगटातील आढळत आहेत खास करून तरुण वर्ग ही मागे नाही .

असो आज आपण याच विषयावर म्हणजे हृदयावर बोलू काही. हृदयाचे आरोग्य व हृदय विकार यावर आजची जीवन पद्धतीचा काय सहभाग आहे ? हे जाणले तर हा विकार बराच आटोक्यात येईल. होत असलेल्या मृत्यूंपैकी आकडेवारी नुसार १२ ते १३ % मृत्यूंचे प्रमाण हे हृदयघाता मुले होत आहे. देशात महाराष्ट्र राज्य सर्व राज्यात अग्रेसर आहे. नविन आकडेवारी नुसार हे प्रमाण आणखी जास्त आहे. जाणिवेने ती आकडेवारी येथे देत नाहीये कारण ते प्रमाण भयावह तर आहेच त्यांचे सोर्स पण खात्रीलायक नाहीत. किंवा आपण वयक्तिक तसे सर्च करू शकता. आपला हा उद्देश्य आहे की आपण सर्वांनी या विषयावर सकारात्मक विचार करून आरोग्यदायी जीवन जगावे, ना की फुगीर आकडेवारी अभ्यासून चिंता करावी .

पूर्वी पासून प्रत्येक लेखात आपण सांगत आलो आहोत त्या प्रमाणे की, हा ही लेख येथे उपलब्ध माहिती आयुर्वेद व तत्सम साहित्य आणि काही अनुभवी वैद्धयांकडून प्राप्त आहे. ती माहितीस्तव आहे व कोण्या एका दाव्या किंवा मताचा आग्रही नाही.

हृदयाची साधारण कार्यप्रणाली

मित्रांनो हृदयाची शास्त्रोक्त कार्यपद्धती फार क्लिष्ट आहे व तिला शब्दात मांडायचे म्हणजे लेख ही मोठा होईल. म्हणून जितके शक्य तितक्या सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न करू. शरीरातील असा महत्वाच भाग की जो फक्त स्नायूंचा बनलेला आहे . मांसपेशिंचा सुबक व सुयोग्य रचना व अंतर्गत चार भाग असलेला ज्याचा आकार स्वतः च्या मुठी एव्हडा आणि ज्याचे वजन साधारणतः ३०० ते ४५० ग्राम असलेला भाग म्हणजे हृदय .

प्राप्त पोषक तत्वे आणि फुफ्फुसांद्वारे मिळालेला प्राणवायू (ऑक्सिजन) शरीराच्या प्रत्येक पेशींपर्यंत पोहचवणे आणि त्यासाठी सतत अव्याहत विशिष्ट लयीत कार्यरत असणे (चालत राहणे) फक्त इतकेच काम एका सुदृढ हृदयाचे असते. दर मिनिटाला साधारणतः ५ लिटर रक्त हृदय ढकलत असतांना ६० ते १०० वेळा धडकते (हृदयाचे ठोके). हृदयातील अंतर्गत चार भाग व चार झडपा रक्ताचा प्रवाह एकाच दिशेने म्हणजे डावीकडून उजवीकडे चालावा म्हणून फार समन्वयाने काम करत असतात.

हृदयविकार

वर सांगितल्या प्रमाणे हृदयाचे कार्य आपल्या लक्षात आले असेलच की शरीराच्या प्रत्येक पेशी पर्यंत पोषकतत्वे द प्राणवायू पोहचवणे . मग या कार्यात काही अडथळा निर्माण होणे किंवा अनियमितता येणे तसेच याची वारंवारिता सतत राहणे किंवा याचे प्रमाण वाढणे म्हणजेच हृदय विकार होय. ही अनियमितता किंवा अडथळा निर्माण होण्याची विविध कारणे व विविध प्रकार आहेत त्या त्या नुसार हृदयविकाराचे प्रकार ही बदलतात. उदा. हृदयशूल (छातीत टोचणे), हृदयशोथ (छातीत ओढल्या सारखे होणे ) , कंठ शोथ (घशामध्ये ओढल्या सारखे होणे . हे पण हृदयविकाराचे एक लक्षण असू शकते. ) , हृदयाघात ( धडकने बंद पडणे.) इत्यादी.आपण जास्त किचकटपणात न जाता सरळ सरळ शब्दात जाणून घेऊयात .

मग ही अनियमितता वा अडथळा काय असू शकतो ? चुकीच्या राहणीमान व खानपान मुळे रक्ताच्या पुरवठ्यामध्ये माध्यम असणारा मार्ग म्हणजे नसा किंवा नाडी तंत्र यामध्ये काही कारणास्तव अडथळा निर्माण होणे, मग तो मेद असू शकतो, किंवा रक्तातील अशुद्धता किंवा शर्करा वाढणे किंवा इतर अनावश्यक अतिप्रमाणात पोषकतत्त्वांच्या नावाखाली कचरा खाल्ला जातो जो शरीरातून बाहेर टाकला जाऊ शकत नाही . परिणामी रक्ताचा नैसर्गिक पातळपणा जाऊन घट्टपणा वाढतो तसेच नस नाड्यामध्ये मेदाच्या गाठी तयार होणे जेणेकरून हृदयाला रक्त ढकलण्यास ताण येतो व याने ही अनियमितता वाढते .मादक पदार्थांचे सेवन अति विचार किंवा मानसिक ताण तणाव असणारे वातावरण किंवा घटना यांनी ह्रदयाच्या नैसर्गिक धडकण्यास अनियमितता येते .ही अनियमितता म्हणजे विकारयुक्त रक्तदाब होय.

रक्तातील मेद किंवा तेलकट तुपट व दुग्धजन्य आणि मांसाहार केल्याने जो स्निग्ध पणा वाढतो त्याला चरबी म्हणणे योग्य होईल ती चरबी वाढल्याने रक्ताला एक दाट पणा वा घट्ट पणा त्यामुळे हृदयाला रक्त पंपिंग करण्यास ज्याला मराठीत ढकलण्यास ताण पडतो व सतत असा ताण पडल्याने हृदयाला एक वेगळाच थकवा जाणवतो व अशीच परिस्थिती जास्त काळ राहिल्यास हृदय कमजोर होऊ लागते. येथूनही  हृदयविकाराची सुरवात होते.

HD22
HD22

हृदयविकाराची लक्षणे

हृदयरोगाची स्वरूपे विविध आहेत व हृदयरोगाची लक्षणे ही त्या त्या नुसार असतात, पण सर्वसाधारण जी आहे त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आपण करत आहोत.
तसे पाहता आपले शरीर स्वतः डॉक्टर आहे बऱ्याच शारीरिक बदलांचे संकेत ते देत असते किंवा येणारे शारीरिक संकटे कशा स्वरूपांची असतील याचे लक्षणे ते दाखवते पण बहुतांशी आपण ते लक्षात घेत नाही किंवा आपण टाळतो .
विनाकारण रात्र रात्र झोप न लागणे . जर असे असेल तर सर्व उचित वैद्यकीय तपासणी करायला हरकत नाही, कारण रात्रीचे विनाकारण जागरण शरीरातील विविध विकारांना बळावण्याचे कार्य करते उदाहरणार्थ वात, पित्त, आमवात, पक्षाघात वा हृदयरोग इत्यादी.
छातीमध्ये खांदा किंवा हातात दुखणे डोके भयंकर दुखणे कारण रक्तातील वसा म्हणजे कोलेस्ट्रॉल जास्त वाढल्यास डोके दुखते . कंबर किंवा पाठीच्या कण्यात विविध ठिकाणी दुखणे . ही सर्व हृदयविकाराची लक्षणे असू शकतात.
चालताना धाप लागणे शारीरिक मेहनत करताना श्वास घेण्यास त्रास होणे . ( राजयक्ष्मा व दम्याच्या रुग्णांना धाप लागते ती वेगळी ) हे देखील हृदय विकाराचे लक्षण असू शकते.
श्वास घेताना किंवा सोडताना हृदय शुल व कंठशोथ जाणवणे म्हणजे हृदय विकार फार धोक्याची पातळीवर पोहचला असे म्हणणे वावगे ठरणार नाही .ताबडतोब वैद्यकीय मदतीसाठी इस्पितळात जाणे योग्य ठरेल.
वरील लक्षणे जास्त दिवस जाणवली किंवा वाढत गेली तर डॉक्टर कडे जाणे कधीही योग्यच.
HD11
HD11 मोबाईल चा अति वापर घातक

हृदय विकार व आजची जीवन पद्धती साठी खबरदारी

 

वरील लिखाण पाहता साधारण अंदाज येऊन जातो की हृदयरोग कशामुळे होतो व त्या त्या कारणांचा विचार करता त्यानुसार पूर्व खबरदारी घेण्याचा प्रयत्न करायला हवा.

आजच्या धकाधकीच्या जीवनपद्धतीमध्ये शरीराची हलचल कमी वैचारिक मानसिक वाढलेली आढळते म्हणून शारीरिक हालचाल वाढवणारे व्यायाम जसे की सर्वात उत्तम नियमित चालणे कमीत कमी अर्धा तास ते दोन तास चालणे, सायकल चालवणे किंवा पाण्यात पोहणे हे सर्व उत्तम व्यायाम आहेत.

बैठे काम करणार आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी चालणे गरजेचे आहे मधुमेही असतील तर त्यांनी दोन्ही जेवणानंतर सुद्धा काही पावले चालणे फारच गरजेचे आहे.

मोबाईलचा अतिवापर हे एक मोठे कारण बनत आहे शारीरिक हालचाल न होण्याचे . म्हणून मोबाईल व तत्सम उपकरणाचा वापर जवळ बंद किंवा फारच नगण्य असावा .

खानपान हे नैसर्गिकरीत्या म्हणजे ऋतुचक्राला अनुसरून असावे व त्यात तेलकट दुप्पट मैदा किंवा तत्सम तसेच साखर यांचा अतिवापर टाळा.

रक्ताचा नैसर्गिक पातळपणा कसा टिकून राहील त्यानुसार खानपान व राहणीमान असावे म्हणजे अतिशय पदार्थ डेअरी उत्पादन म्हणजे ब्रेड पाव खारी वगैरे पदार्थ यांचा वापर जाणीवपूर्वक टाळावा.

दूध व दुग्धजन्य पदार्थांचा अनावश्यक व अतिवापर टाळावा . (अंग मेहनत करणारांनी दूध दही लोणी तू पण शुद्ध स्वरूपातील खाल्ले तर चालते . ) पण बैठे काम करणाऱ्यांनी याचा वापर टाळावा .

उचित राहणीमान म्हणजे रात्री जागरण नसावे दिवसा झोप टाळावी अति थंडीपासून वाचावे इत्यादी.

ज्यांच्या घरामध्ये हृदयविकाराचा इतिहास असेल म्हणजे हृदयविकार अनुवंशिकतेने आला असेल त्यांनी वरील सर्व नियम तर पाळावेच सोबतच नियमित वैद्यकीय चाचण्या करून घ्याव्यात.

हृदय अचानक बंद पडणारा मध्ये मधुमेह हटकून आढळतो म्हणून मधुमेहाबाबत सजगता असावी . विशेषता ज्यांच्या घरामध्ये अनुवंशिकतेने मधुमेह लाभलेला आहे अशांनी मधुमेह याविषयी जागृत असावे.

सर्वात रामबाण औषध म्हणजे मानसिक आरोग्य सांभाळणे . यासाठी ध्यान सर्वोत्तम उपाय आहे . आणि ध्यान लागण्यासाठी आर्ट ऑफ लिविंग चे प्रणेते श्री श्री रविशंकर जी यांचे प्रासादिक असलेली सुदर्शनक्रिया ही फार उत्तम माध्यम आहे .
असे म्हणतात की ज्याचे मन मजबूत त्याचे शारीरिक आरोग्य ही सर्वात उत्तम म्हणून मनाला असे प्रशिक्षित करावे की जीवनातील कसल्याही प्रसंगात हृदयाची धडधड सामान्य कशी राहील . बस हे साधता आले की हृदयरोग समाजातून देवीच्या रोगाप्रमाणे दुर्मिळ होऊन जाईल.

यावर अजूनही बरेच लिहिता येईल पण हृदयरोगाची कारणे व लक्षणे आणि उपाय साधारणतः लक्षात यावीत यासाठी हे लिखाण केले . आशा आहे की आपणास हे आवडले असेल व याचा आपणास फायदा नक्की होईल . परत एकदा हे नमूद करावेसे वाटते की हृदयरोग होण्यापूर्वी तो टाळावा म्हणून जी खबरदारी असावी च्यासाठी या लेखाचे प्रयोजन आहे

1 thought on “हृदय विकार व आजची जीवन पद्धती / Heart Disease And Today’s Life Style”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top