ऑपरेशन सिंदूर १ सडेतोड उत्तर

ऑपरेशन सिंदूर १ सडेतोड उत्तर
ऑपरेशन सिंदूर

ऑपरेशन सिंदूर १ सडेतोड उत्तर

काही दिवसांपूर्वी म्हणजे २२ एप्रिल ला झालेल्या पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अगदी काल म्हणजे सहा मे पर्यंत सांगितले जात होते की भारत सडेतोड उत्तर देताना कोणत्याही क्षणी पाकिस्तानावर क्षेपणास्त्र हल्ला करू शकतो आणि रात्री उशिरा म्हणजे सात मे च्या मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटांनी क्षेपणास्त्र हल्ला सुरू करून ऑपरेशन सिंदूर १ सडेतोड उत्तर दिले गेले . २५ मिनिटात पाकिस्तानच्या ९ ठिकाणांवर भारताने हल्ला केला या पूर्ण कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. भारताकडून पाकिस्तानच्या वारंवार करवल्या गेलेल्या अतिरेकी कारवायांना विशेषता २२ एप्रिल २०२५ च्या पहलगाम मधिल २६ सामान्य प्रवाशांच्या भ्याड हत्या सत्राचे सडेतोड उत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर कारवाई करण्यात आली .

या सर्व कारवाईत भारताने स्पष्ट केले आहे की पाकिस्तानच्या लष्कर किंवा सामान्य नागरिक स्थळांवर हे हल्ले केलेले नसून विविध सोर्स कडून मिळालेल्या माहितीनुसार अतिरेकी व अतिरेकी कारवायांना जेथे रचले जात होते अशी ठिकाणे निशाणा बनवण्यात आली मात्र पाकिस्तान नेहमीप्रमाणे भारताने नागरिक ठिकाणावर हल्ले केलेले सांगत आहे . पैकी आठ जण नागरिक या हल्ल्यात मृत पावले असे पाकिस्तान कडून सांगण्यात येत आहे . भारत-पाक सीमेवरील चालू गोळीबाराच्या चकमकीत तीन भारतीय नागरिक मृत पावल्याचे भारताकडून सांगण्यात आले आहे .

पहलगाम हल्ल्याचे कर्तेधर्ते सर्व पाकिस्तान मधीलच व सर्व कट रचणारे ही तेथीलच असल्याचे पुरावे भारताकडे आहेत असे सरकारी सूत्रांकडून सांगण्यात आले . असे असूनही पाकिस्तान गत पंधरा दिवसापासून याची जबाबदारी स्वीकारत नाही या अनुषंगाने ऑपरेशन सिंदूर १ सडेतोड उत्तराचे प्रयोजन करण्यात आले .

या ऑपरेशन सिंदूरला लष्कराच्या तिन्ही दलांनी योग्य समन्वयाने अमलात आणले यामध्ये खालील नऊ ठिकाणी हल्ले करण्यात आले यामध्ये सवाई नाला कॅम्प मुजफ्फराबाद – २० ऑक्टोबर २०२४ सोनमर्ग हल्ला,  २४ ऑक्टोबर २०२४ गुलमर्ग हल्ला, आणि २२ एप्रिल २०२५ पहलगाम हल्ला हे सर्व दहशतवादी या प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेऊन आले होते हे लष्कर ए तोयबा चे प्रशिक्षण केंद्र आहे .

  • सय्यद बिलाल कॅम्प मुजफराबाद -जैसे मोहम्मद चे प्रशिक्षण केंद्र.
  • गुलफुर कॅम्प कोटली – लष्करे ए तोयबा चे स्थळ २०  एप्रिल २०२३  उंच हल्ला९  जून २०२४ तीर्थयात्री हल्ला .
  • बरनाला कॅम्प भिमबर – शस्त्रे चालवणे आयडी बनवणे व जंगलात कसे राहावे याचे ट्रेनिंग सेंटर .
  • अब्बास कॅम्प कोटली -लष्करे तोयबाचे आत्मघातकी हल्लेखोर प्रशिक्षण केंद्र .
  • सरजल कॅम्प सियालकोट – दहशतवादी प्रशिक्षण केंद्र मार्च २०२५ जम्मू काश्मीरच्या चार जवानांची हत्या करणारे हल्लेखोर .
  • मेहमुना जोया कॅम्प सियालकोट – हिज्बुल मुजाहिद्दीनचे मोठे तळ पठाणकोट एअर बेस वरील हल्लेखोर .
  • मरकज तय्यबा मुरिदके – २००८  मधील मुंबई वरील दहशतवादी हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांचे प्रशिक्षण केंद्र .
  • मरकज सुभानल्ला भवलपूर – जेशे मोहम्मद चे मुख्यालय .

वरील ठिकाणी पाकव्याप्त व पाकिस्तान मधील आहेत भारतीय सैन्याकडून अधिकृतरित्या प्राप्त माहितीनुसार वरील ठिकाणी हल्ल्यासाठी निवडली गेली .

सैन्य बलाबल ( ऑपरेशन सिंदूर १ सडेतोड उत्तर च्या धर्तीवर )

जर तुलनात्मक दृष्ट्या सैन्य बलाबल पाहिले तर भारताकडे पायदळ जवळजवळ २२ लाख जवान ५१३ लढाऊ विमाने ८०  लढाऊ हेलिकॉप्टर दीड लाखाच्या घरात चिलखती वाहने४२००  एक रणगाडे व १८ पाणबुड्या आहेत .

वायुदलाचा अंदाज घेतला तर तीन लाख दहा हजार वायुसैनिक व वरील प्रमाणे दर्शवल्यानुसार २२२९ विमाने ज्यामध्ये ५१३  लढाऊ तर २७०  वाहतुकीची विमाने आहेत सहा इंधन पुनवरारी व ३५१  ट्रेलर विमाने आहेत सैन्याच्या तिन्ही दलाकडे एकूण 899 हेलिकॉप्टर आहेत .

नौदलाचा विचार करता भारताकडे १.४२ लाख नौ सैनिक आहेत २९३ वेगवेगळ्या युद्ध नौका यामध्ये दोन विमानवाहू जहाजे व १८ पाणबुड्या यांचाही समावेश आहे .

उपलब्ध सोर्सनुसार भारताकडे २०२४ च्या आकडेवारी नुसार १७२ पाकिस्तान कडे १७० अण्वस्त्रे आहेत . एकंदरीत पाहता भारताकडून केल्या गेलेल्या हल्ल्याकरिता भारताकडे सबळ व सज्जड पुरावे असलेली कारणे आहेत . सतत वारंवार विविध दहशतवादी संघटनांना पोसवून त्यांच्याकडून भ्याड हल्ले करायची, ही सततची डोकेदुखी थांबवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर १ सडेतोड उत्तर म्हणता येईल . सबळ कारणे पाहता आंतरराष्ट्रीय स्तरावरही दहशतवादात होरपळलेली देश भारताच्या बाजूने असणार आहेत . अमेरिकेनेही सर्व बाजूंचा अभ्यास करत राष्ट्राध्यक्ष श्री ट्रम्प द्वारे यावर हे लवकर संपेल असे मत मांडले आहे .देशातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांचाही या कारवाईस पाठिंबा आहे .

वरील प्रमाणे जर परिस्थिती बनत आहे तर पाकिस्तानसाठी ती कधीच हिताची नाही यात शंका नाही आजही पाक कर्जामध्ये बुडालेला देश आहे व ऑपरेशन सिंदूर चा नंतर युद्ध जर झाले तर पाकिस्तानचे कंबरडे नक्कीच मोडणार याच संशय नाही .

ऑपरेशन सिंदूर १ सडेतोड उत्तर या धर्तीवर युद्ध सुरू झाले तर एक भारतीय म्हणून आपण खालील काही गोष्टींना नक्कीच अमलात आणायला पाहिजे . कारण खालिल शक्यता नाकारता येणार नाहीत .

आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदिजी या सर्व परिस्थितीला सर्व स्तरांवर योग्य पद्धतीने हाताळतील असा आपल्याला पूर्ण विश्वास आहे. यात संशय बाळगणे चे काही कारण नाही. मग आपणही त्यांच्या या भूमिकेला समर्थन देण्यासाठी खालिल काही बाबींचा विचार नक्की करूयात.

ऑपरेशन सिंदूर १ सडेतोड उत्तर
पंतप्रधान श्री नरेंद्रमोदिजी

प्रिय भारतीयांनो,

पाकिस्तान आणि त्याची गुप्तचर संस्था, आयएसआय, आता आंतरराष्ट्रीय सहानुभूती मिळविण्यासाठी आणि भारतीय जनतेची दिशाभूल करण्यासाठी – एक मोठे प्रचार युद्ध सुरू करतील. त्रासदायक फोटो, भावनिक व्हिडिओ आणि बनावट माहितीपटांचा पूर येण्याची अपेक्षा लक्षात घ्या . सोशल मीडिया आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर फिरणारी कोणतीही असत्यापित सामग्री फॉरवर्ड, शेअर करू नका किंवा त्यावर विश्वास ठेवू नका.

फक्त अधिकृत माध्यमांद्वारेच माहिती घेत रहा जसे  – संरक्षण मंत्रालय, पीआयबी आणि प्रतिष्ठित राष्ट्रीय माध्यमे. अप्रमाणित अपडेट्सचा अंदाज लावून किंवा पसरवून माहिती परिसंस्थेत गोंधळ घालू नका.

राष्ट्रासोबत ठाम रहा
हा राष्ट्रीय एकतेचा क्षण आहे. भारतीय सैन्य, सरकार आणि राष्ट्रीय सुरक्षा संस्थांना अढळ पाठिंबा द्या. अंतर्गत दोषारोप आणि फूट पाडणाऱ्या चर्चा टाळा.

भारतविरोधी घटकांना ओळखा आणि त्यांचे निरीक्षण करा:
तुमच्या परिसरात, कामाच्या ठिकाणी किंवा सामाजिक वर्तुळात लक्ष ठेवा. शत्रूबद्दल उघडपणे शत्रुत्व किंवा सहानुभूती व्यक्त करणाऱ्या व्यक्तींची नोंद घ्या. अशा धमक्या वाढविण्यासाठी लवकरच औपचारिक रिपोर्टिंग चॅनेल उपलब्ध करून दिले जातील म्हणून एक गुप्त रेकॉर्ड ठेवा.

अंतर्गत अशांततेपासून सावध रहा:
शत्रू अंतर्गत अराजकता निर्माण करण्याचा, दंगली भडकवण्याचा किंवा सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो. हिंदू-मुस्लिम वादविवादात सहभागी होऊ नका किंवा फूट पाडणाऱ्या कथनांना वाढू देऊ नका. कोणत्याही स्थानिक अशांततेच्या बाबतीत, सुरक्षिततेला प्राधान्य द्या आणि ताबडतोब अधिकाऱ्यांना कळवा.
घाबरू नका – राष्ट्रीय यंत्रणेवर विश्वास ठेवा:
शांत राहा आणि अन्न, औषधे किंवा इतर आवश्यक वस्तूंची अनावश्यक भीतीने खरेदी किंवा साठवणूक करू नका. पाकिस्तान किंवा त्याच्या सहानुभूतीदारांकडून आवश्यक वस्तू किंवा रोख रकमेच्या कमतरतेबद्दल बनावट संदेश निर्माण होऊ शकतात. अतिरेकी प्रतिक्रिया देऊ नका.

आपल्या देशात मजबूत व्यवस्था आहेत आणि अशा घटनांमुळे आवश्यक वस्तूंचा पुरवठा विस्कळीत होत नाही.
तसेच, अनावश्यकपणे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढणे टाळा. बँका आणि एटीएम सामान्यपणे कार्यरत राहतील. आपल्या राष्ट्रीय पायाभूत सुविधांच्या लवचिकतेवर विश्वास ठेवा.

मानसिक युद्धात भूमिका:
लक्षात ठेवा, प्रत्येक भारतीय नागरिक मानसिक युद्धात आघाडीचा सैनिक आहे. शांत राहा, लवचिक राहा आणि तुमचे मनोबल उंच ठेवा. भीती पसरवणाऱ्या किंवा खोट्या बातम्यांना बळी पडू नका. तुमची मानसिक ताकद आपल्या सैनिकांच्या शौर्याइतकीच महत्त्वाची आहे.

सायबर सुरक्षा खबरदारी:
फिशिंग लिंक्स, बनावट वेबसाइट्स आणि विशेष फुटेज किंवा बातम्या दाखवल्याचा दावा करणाऱ्या संशयास्पद ईमेल/संदेशांपासून सावध रहा. शत्रूच्या सायबर सेलकडून गुप्त माहिती गोळा करण्यासाठी किंवा मालवेअर पसरवण्यासाठी अशा युक्त्या अनेकदा वापरल्या जातात.

संशयास्पद क्रियाकलापांची तक्रार करा:
कोणत्याही संशयास्पद हालचाली, अज्ञात वस्तू किंवा स्थानिक कायदा अंमलबजावणी संस्थांना संभाव्य धोक्यांची त्वरित तक्रार करा. तुमची वेळेवर कारवाई जीव वाचवू शकते.

जय हिंद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top